Posts

Showing posts from December 1, 2019

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागच्या वतीने प्रश्नचिन्हात प्रदर्शनी आयोजन

Image
आज प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मध्ये भारत सरकारच्या पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जनजागृती अभियान चे प्रदर्शन.

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

Image
  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मध्ये पुण्यस्मरणाचा कार्यक्रमाचे आयोजन

प्रश्नचिन्हात संविधान दिन साजरा

Image
सामुहिक संविधान उद्देशिका पठण करताना प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यी व शिक्षक गण. संविधान दिनानिमित्त प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मध्ये सामुहिक संविधान उद्देशिका पठण करण्यात आली व  विद्यार्थीनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले 

प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत परिनिर्वाण साजरा

Image
महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मध्ये पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमकार पवार सर व माध्यमिक मुख्याध्यापक श्री प्रशांत गोरामन सर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. साबळे सर यांनी केले तर  प्रशांत गोरामन सर यांनी अध्यक्ष भाषण करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजय काळबांडे सरांनी केले याप्रसंगी प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील मुलांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून अभिवादन केले.

प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला सरकारने समृद्धी हायवे चे काम राखुन ठेवल्याच्या कारणाने तब्बल ७८ लक्षाचा दंड ठोठावला

Image
मतीन भोसले यांच्या *प्रश्नचिन्ह आश्रमशाळा* वर  सरकारने *समृद्धी हायवे* चे काम राखुन ठेवल्याच्या कारणाने तब्बल *७५ लक्ष* रूपयांचा दंड ठोठावला. *मतीन भोसले* यांच्या अथक प्रयत्नातुन *भिक मागो ,रास्ता रोको, प्रशासकीय कार्यालयी ठिय्या आंदोलनातून* असे अगणित आंदोलने करत _दारोदारी हिंडून आपल्या ४७१  आदिवासी वंचित  पाकीटमारी करणारे, रेल्वे स्टेशन बस स्थानक वर  भिक मागणारे, निराधार अनाथ बेसाहारा वंचित  फासेपारधी समाजाच्या बालकांना_ मोफत शिक्षण मिळावे यासाठी देशातील एकमेव प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा सुरू करून शासनाच्या सक्तीच शिक्षण देण्याचा निर्णयावर ते स्व:ता  दारोदारी भिक मागून शिकवत अंमलबजावणी करतात पण  आजही सरकारची प्रश्नचिन्ह आश्रमशाळेप्रती भुमिका स्पष्ठ नाही. मतीनच्या अविरत संघर्षातुन निर्माण झालेल्या टिन पत्र्याच्या शेड व काही दानशुरांच्या मदतीने बांधण्यात आलेल्या इमारतीवर सरकारची तिरपी नजर असल्याचे दिसते.