विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा / विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा

विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा / विभागीय आयुक्तालयात भरली विद्यार्थ्यांची शाळा



प्रतिनिधी

Sep 30, 2015, 04:05 PM IST
अमरावती - आश्रमशाळेतील विविध समस्यांना घेऊन फासेपारधी समाजातील विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आज (२९ सप्टेंबर) शाळा भरवली. शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागल्याचे फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी त्यांच्या कक्षातून खाली येत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या
आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील आदिवासी फासेपारधी सुधार समितीमार्फत प्रश्नचिन्ह आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. आश्रमशाळेला १८ जुलै २०१४ च्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत आश्रमशाळेत ४४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत ते १० वर्ग असून, शिक्षण घेण्यासाठी इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. संस्थेची स्थिती वाईट असल्याने आदिवासी आश्रमशाळेची पक्की इमारत बांधण्याची आर्थिक क्षमता नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. फासेपारधी समाजातील उपेक्षित मुलांच्या मोफत शिक्षण, भोजन निवासी आश्रमशाळेच्या व्यवस्थापन मंडळाने सोय केली आहे. मात्र, आश्रमशाळेला शंभर टक्के शासकीय अनुदान मंजूर करण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही अव्यवस्था प्रशासनासमोर यावी म्हणून सकाळपासून हे विद्यार्थी विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून होती. दुपारी च्या सुमारास विभागीय आयुक्त राजुरकर, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी भेट घेत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी मतीन भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित होते.
तिवारींचेप्रश्नोत्तर : विद्यार्थ्यांशीचर्चा करत असताना वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. अंत्योदय योजनेचा लाभ कोणाला मिळतो, जमिनीचा पट्टा कोणाला मिळाला नाही, शिवाय कोणाकडे घरकुल नाही, असा प्रश्नदेखील उपस्थितांना विचारण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांचेआश्वासन : फासेपारधीसमाजाचे जिल्ह्यात दोन हजार कुटुंब राहतात, त्यांच्यासाठी ४१५ घरकुल उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. शिवाय उर्वरित कुटुंबांनादेखील घरकुल दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना ई-क्लास मधून जमीन दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.
मुजरिमना कहना... : आश्रमशाळेतीलविद्यार्थ्याने फासेपारधी समाज तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनातील वास्तव उघड करणारे गाणे सादर केले. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोर तिवारी यांच्यासमोर हे गीत सादर करण्यात आले. मुजरिम ना कहना लोगो... , असे बोल ऐकून उपस्थितांचे डोळेदेखील पाणावले होते.


संदर्भ-https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AMR-students-school-held-at-divisional-commissioner-5128221-NOR.html

Comments

प्रश्नचिन्ह लढाई पढाई साथ साथ !

मतिनजी भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात दिली पुस्तके

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवोपक्रम राबवित प्रश्नचिन्ह आश्रमशाळेत मुलींना शाळेचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला .